आशियात चित्ता नामशेष का झाला?
आशियामध्ये तर चित्त्यांची प्रजाती नामशेषच झाली. अपवाद फक्त इराणचा म्हणावा लागेल. इराणमध्ये चित्त्याच्या संरक्षणासाठी अनेक उद्याने आहेत. त्यांची विशेष काळजीही घेतली जाते. भारतात 70 वर्षांपासून चित्ता नामशेष आहे. आता इराणनंतर भारताने चित्त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी आफ्रिकेतील नामीबियातून भारतात 8 चित्ते आणण्यात आले. हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. यात पाच माद्या, तर तीन नर चित्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतात 70 वर्षांनी पुन्हा चित्त्यांची म्याव म्याव ऐकायला मिळणार आहे. त्या निमित्त जगभरातील चित्त्यांवर टाकलेला प्रकाश….
चित्ता नामशेष होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. शिकार हे त्यामागील प्रमुख कारण आहे. भौतिक विकासामुळे चित्त्याची अधिवासाची स्थाने धोक्यात आल्यानेही चित्ता नामशेष झाला आहे. केवळ इराणमध्ये चित्त्यासाठी ठोस पावले उचलली गेली. अन्यत्र आलबेलच आहे. आता भारतात चित्त्याचं अस्तित्व टिकून राहील अशी अपेक्षा करूया.
चित्ता नामशेष होण्याची तीन कारणे
चित्त्याच्या संवर्धनासाठी काय आहेत प्रयत्न?
चित्त्याविषयी हे माहिती आहे काय?
#चित्ता_नामशेष #चित्ता नामशेष_का_झाला #चित्ता