कोणाला हवी चार दिवसांची कसोटी?

पाच दिवसीय कसोटीला १४३ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. क्रिकेटचा आत्मा म्हणून या कसोटीचं आजही क्रिकेटपटूंच्या मनात एक अढळ स्थान आहे. मात्र, आता ही पाच दिवसांची कसोटी चार दिवसांची करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने | ICC |आणला आहे. त्यावरून अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला आहे. यात विराट कोहलीपासून ग्लेन मॅकग्रथ, शोएब अख्तर अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही यात उडी घेत ‘आयसीसी’च्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. नेमके काय आहे या नव्या प्रस्तावात, त्यामुळे काय बदल होतील, नव्या प्रस्तावानुसार चार दिवसांची कसोटीमुळे काय नुकसान होणार आहे किंवा काय फायदा होणार आहे, कोणाला हवीय ही चार दिवसांची कसोटी, याचा ३६० अंशांतून घेतलेला वेध…
कसोटी सामन्याची सुरुवात कधी झाली?
कसोटीतले | Test cricket match | बदल समजून घेताना कसोटीच्या इतिहासात डोकावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुळात क्रिकेटची जडणघडणच कसोटी क्रिकेटमधून झाली आहे. कलात्मक फलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजीची शैली असो वा अन्य काही क्रिकेट कौशल्य | Cricket Skill | असो, हे सर्व या कसोटीची | Test Cricket | देण आहे. म्हणूनच कसोटीला क्रिकेटचा आत्मा म्हंटले जाते. याची सुरुवात मेलबर्नपासून झाली. पाच दिवसीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला अधिकृत सामना १५ ते १९ मार्च १८७७ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला. मेलबर्न मैदानावर | Melbourne Stadium | झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी जिंकला होता. या कसोटी क्रिकेट सामन्याचे शतकमहोत्सवही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानेच साजरे करण्यात आले. हा पहिला सामना झाला १२ ते १७ मार्च १९७७ रोजी. गंमत म्हणजे, हा सामनाही ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनीच जिंकला. इतिहासातला पहिला आणि शंभरावा सामना एक प्रकारे ऑस्ट्रेलियानेच साजरा केला. यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये कसोटी सामना प्रकाशझोतात खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तीन वर्षांनी झाली. म्हणजे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान अॅडीलेडमधील ओव्हल मैदानावर झाला. ऑस्ट्रेलिया नशीबवानच म्हणायला हवा, ज्यांनी कसोटी पर्वाचा, प्रकाशझोतातील सामन्याचा श्रीगणेशा केला.
काय आहे कसोटी बदलाचा नवा प्रस्ताव?
आयसीसीचे | ICC | क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक प्रचंड व्यस्त आहे. यात पाच दिवसांच्या कसोटी | 5-day Test Cricket | स्पर्धांचा कार्यक्रम अतिशय वेळखाऊ आहे. जर कसोटी चार दिवसांची केली तर वेळ वाचेल, त्याचबरोबर अधिकाधिक स्पर्धाही आयोजित करता येतील, असा आयसीसीचा विचार आहे. त्यामुळेच कसोटी पाचऐवजी चार दिवसांची करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. २०२३ च्या मोसमापासून हा बदल अनिवार्य करण्याचा आयसीसीचा | ICC | विचार आहे. मात्र, हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठीच करण्यात येणार आहे. हा बदल यशस्वी झाला तर कसोटी चार दिवसांचीच राहणार आहे. | espncricinfo |ने एका वृत्तात या नव्या बदलामागचे कारण दिले आहे. क्रिकेटच्या स्पर्धा जास्तीत जास्त व्हाव्यात, तसेच ‘बीसीसीआय’च्या मागणीनुसार, दोन देशांमधील मालिकांची संख्या वाढावी आणि आयपीएलसारख्या टी-२० लीग सर्वच ठिकाणी व्हाव्यात, यासाठी आयसीसी कसोटीत बदल करीत आहे. आयसीसीचा हा प्रस्ताव व्यावसायिकतेतूनच पुढे आला आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तो सादर करण्यात आला आहे.
कोणाला हवाय चार दिवसांचा कसोटी सामना?
यापूर्वी झालेल्या चार दिवसांच्या कसोटी सामन्याच्या प्रयोगानंतर हा नवा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केव्हिन रॉबर्ट्स यांनाही पटला. ‘ईएसपीएन’शी | ESPN | बोलताना ते म्हणाले, की या नव्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. पारंपरिक विचार न करता आता व्यावहारिक विचार व्हायला हवा. यापूर्वीचे कसोटी सामने पाहिले तर किती षटके खेळली गेली, किती वेळ लागला हे एकदा तपासून पाहिले तर लक्षात येईल की चार दिवसांची कसोटी योग्य आहे. रॉबर्ट यांना जरी हा नवा प्रस्ताव पटला असला, तरी ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला कडाडून विरोध केला आहे.
चार दिवसांची कसोटीचा प्रयोग यापूर्वी कुठे झाला?
पाचऐवजी चार दिवसांची कसोटी झाल्यास स्पर्धांचा कार्यक्रम वाढेल अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे. मुळात चार दिवसांचा कसोटी सामना नवा नाही. २०१९ मध्ये इंग्लंड व आयर्लंड यांच्यात चार दिवसांची कसोटी सामना झाला आहे. तत्पूर्वी, २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे दरम्यान चारदिवसीय कसोटी सामना झाला होता.
चार दिवसांची कसोटी का नको?
फिरकी गोलंदाजांना संधी मिळणार नाही. कारण पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीला पोषक झालेली असते. |
सामने निकाली निघणार नाहीत. जास्तीत जास्त सामने अनिर्णीतच | Draw | राहण्याची शक्यता अधिक |
पाचवा दिवस चुरशीचा मानला जातो. चार दिवसीय क्रिकेटने ही चुरस राहणार नाही |
अनेक कसोटी सामन्यांचे निकाल पाचव्या दिवशीच लागलेले आहेत. |
कसोटीतच शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींची कस लागतो. तेच या पाच दिवसांच्या कसोटीचे वैशिष्ट्य आहे. |
विराट कोहलीच्या मते, बदल काय हवा?
कसोटी आकर्षक करायची असेल तर खेळपट्ट्या उत्तम केल्या पाहिजे. कारण खेळपट्टी चांगली असेल तर सामना रटाळ होणार नाही. खेळपट्टी अशी असावी, जी फलंदाज आणि गोलंदाजांना साह्यभूत ठरेल. त्यामुळे फलंदाजांना हे जाणवेल की चूक केली नाही, तर आउट होणार नाही आणि गोलंदाजांनाही वाटेल, की फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडू.
का नको चारदिवसीय कसोटी सामना?
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
Follow us